हसू आणि आसू....
आज सकाळची जेवणाची सुट्टी झाली.
सर्वजण मजाक मस्ती करत जेवलो.
जेवण होता होता पहिलीतला एक मुलगा आला व म्हणाला,"सर , सुजितदादा जेवला नाय.रडत बसलाय."
मी कट्ट्याकडं नजर टाकली.सुजित नेहमीच्या जागी जेवायला नव्हता.
मी सुजितला बोलावलं.
डोळे लालसर झालेले , मान खाली.
मला काहीच उमजेना.
"सुजित,काय झालं पिल्ल्या रडायला? कुणी काही बोललं का? काही अडचणय का?"
सुजितच्या डोळ्यांतून पाणी वाहतच होतं.
आज सकाळची जेवणाची सुट्टी झाली.
सर्वजण मजाक मस्ती करत जेवलो.
जेवण होता होता पहिलीतला एक मुलगा आला व म्हणाला,"सर , सुजितदादा जेवला नाय.रडत बसलाय."
मी कट्ट्याकडं नजर टाकली.सुजित नेहमीच्या जागी जेवायला नव्हता.
मी सुजितला बोलावलं.
डोळे लालसर झालेले , मान खाली.
मला काहीच उमजेना.
"सुजित,काय झालं पिल्ल्या रडायला? कुणी काही बोललं का? काही अडचणय का?"
सुजितच्या डोळ्यांतून पाणी वाहतच होतं.
मग माझ्या लक्षात आलं 'चिमणीची पिल्लं'
"सुजित,पिल्लांसाठी रडतोय का रे??"
माझा आवाजही गदगदलेला....
त्याने मानेनेच होय बोलला.
मी समजून गेलो.त्याला दोन घास खायला लावले.
मला दोन दिवसांतल्या सगळ्या घटना आठवल्या.
शाळेसमोरची जुईची वेल तार तुडल्याने खाली पडलेली.मुलांना त्यात एक घरटं सापडलं .त्यात दोन पिली होती. चिमणीची.
काय करावं हा विचार डोक्यात येताच मुलांनी शाळेतल्या छापडीच्या घरात त्यांची राहण्याची व्यवस्था करून वर ठेऊन टाकलं.हेतू हा की मांजर जाऊ नये व आई आली तर पिलं लवकर सापडतील.
सुजितने त्यांना पाणी ठेवलं, खिरीसाठी भरडलेले गहू टाकले.
आजवर जी मुलं अशा लहान पिलांना दगडाने ठेचून मारत होती. इजा करत होती.तीच दोघं तिघं त्या पिलांसाठी धडपडत होती. सुजित त्यात अग्रेसर होता.
आज सकाळची शाळा. मुलांनी आल्या आल्या पिलांची हालहवा पाहिली.आणि पोरं जाग्यावर गपगार झाली !
एक पिलू मरून पडलेलं.सुजित जीव कळवळला.
तासाभरात दुसरा जीवही मरून गेला. सुजित पार कोलमडून गेला.दोन दिवसांत न जाणो काय नातं बनलं होतं त्यांचं !!
मुलांनी दोन्ही पिलांना पुरलं.व सोबत दोन गुलमोहराच्या बिया पेरून ठेवल्या.
मातीआड गेलेल्या पिलांची आठवण म्हणून दोन दगड ठेवले.
नावं दिली .....करण आणि आर्जुन ....
काळजात चर्र झालं.
सुजितची समजूत काढली .....पर आतून मीही गदगदलो होतो.
काल ख्रिसमसची भेट मिळालेले दोन इवले इवले जीव भरभरून आनंद देऊन या जगातनं चालतेही झाले......
काल त्या पिलांचे फोटो काढताना सुजित हरकला होता.हसत होता.पिलं अँगलने ठेवत होता.
पर
आज मात्र तो पिलांची समाधी पहायला आला नाही.वर्गात बेंचवर डोकं टेकवून रडत होता अन त्या लहान जीवाची समजूत काढायला माझं मोठंपणही उणं पडलं होतं.......!!!
दि. 27/12/2014
"सुजित,पिल्लांसाठी रडतोय का रे??"
माझा आवाजही गदगदलेला....
त्याने मानेनेच होय बोलला.
मी समजून गेलो.त्याला दोन घास खायला लावले.
मला दोन दिवसांतल्या सगळ्या घटना आठवल्या.
शाळेसमोरची जुईची वेल तार तुडल्याने खाली पडलेली.मुलांना त्यात एक घरटं सापडलं .त्यात दोन पिली होती. चिमणीची.
काय करावं हा विचार डोक्यात येताच मुलांनी शाळेतल्या छापडीच्या घरात त्यांची राहण्याची व्यवस्था करून वर ठेऊन टाकलं.हेतू हा की मांजर जाऊ नये व आई आली तर पिलं लवकर सापडतील.
सुजितने त्यांना पाणी ठेवलं, खिरीसाठी भरडलेले गहू टाकले.
आजवर जी मुलं अशा लहान पिलांना दगडाने ठेचून मारत होती. इजा करत होती.तीच दोघं तिघं त्या पिलांसाठी धडपडत होती. सुजित त्यात अग्रेसर होता.
आज सकाळची शाळा. मुलांनी आल्या आल्या पिलांची हालहवा पाहिली.आणि पोरं जाग्यावर गपगार झाली !
एक पिलू मरून पडलेलं.सुजित जीव कळवळला.
तासाभरात दुसरा जीवही मरून गेला. सुजित पार कोलमडून गेला.दोन दिवसांत न जाणो काय नातं बनलं होतं त्यांचं !!
मुलांनी दोन्ही पिलांना पुरलं.व सोबत दोन गुलमोहराच्या बिया पेरून ठेवल्या.
मातीआड गेलेल्या पिलांची आठवण म्हणून दोन दगड ठेवले.
नावं दिली .....करण आणि आर्जुन ....
काळजात चर्र झालं.
सुजितची समजूत काढली .....पर आतून मीही गदगदलो होतो.
काल ख्रिसमसची भेट मिळालेले दोन इवले इवले जीव भरभरून आनंद देऊन या जगातनं चालतेही झाले......
काल त्या पिलांचे फोटो काढताना सुजित हरकला होता.हसत होता.पिलं अँगलने ठेवत होता.
पर
आज मात्र तो पिलांची समाधी पहायला आला नाही.वर्गात बेंचवर डोकं टेकवून रडत होता अन त्या लहान जीवाची समजूत काढायला माझं मोठंपणही उणं पडलं होतं.......!!!
दि. 27/12/2014
mast o !!!...
ReplyDelete